Breaking News

अपघाताचे प्रमाण वाढलेले असून तातडीने काम पूर्ण करण्याची गरज

 अपघाताचे प्रमाण वाढलेले असून तातडीने काम पूर्ण करण्याची गरज

पुरपुढी प्रभागामधील नालीचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करावे - चेतन भाऊ पाल,भाजपा युवा नेते, विसापूर 

महा घडामोडी न्युज नेटवर्क,चंद्रपूर : ग्रामपंचायत कार्यालय विसापूर यांना विसापूर पुरबुडी भागातील नालीचे टेंडर पूर्ण झालेले असल्यास बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी निवेदना मार्फत केलेली आहे. काही दिवसा आधी निवेदन करून पुरबुडी भागतील नाली बांधकाम करण्याची मागणी केली होती. त्यानंतर माहिती दिली की ई- टेंडर झालेला आहे. परंतु अजून पर्यंत कामाला सुरवात झाली नसून लवकरत लवकर नालीचे बांधकाम सुरु करून या पावसाळ्यात त्या नालीच्या खोदकामामुळे होणाऱ्या आपघातांना आळा घालावा, नालीचे बांधकाम रखडल्यामुळे माथी नि येणार जाणार लोकांचे अपघात होत आहे, 

आणि विसापूर मध्ये नागरिकांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर विषयाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याचे करावे मार्गी लावावेत ही अपेक्षा करतो या प्रकारची मागणी श्री. चेतन भाऊ पाल यांनी केलेली आहे. चेतन भाऊ पाल विसापूर चे युवा नेते असून त्या या विषयकडे ग्रामपंचायत नि गंभीरपणे लक्ष् देतील अशी अपेक्षा देखील केलेली आहे भाऊ पाल (भाजपा युवा मोर्चा बल्लारपूर विधानसभा सोशल मीडिया प्रमुख म्हणून ते कार्यरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत