'आमचे बाबूजी अनेकांचे जीवन दाते' इंजी.रत्नदीप दहिवले
'आमचे बाबूजी अनेकांचे जीवन दाते' इंजी.रत्नदीप दहिवले
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे,गोंदिया :
माझ्यासह अनेकांच्या जीवनात बाबूजींनी प्रज्ञा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वांच्या दारात' ज्ञान सरिता'पोहोचवण्याचे व खऱ्या अर्थाने इतरांचे जीवन फुलवणारे, सामान्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे 'किमयागार' आहेत. त्यांनी अत्यंत खडतर प्रवासात कोणत्याही वादळाला न जुमानता संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल केली. आमची बाबुजी अनेकांचे जीवन दाते व समाजाचे मार्गदर्शक ठरले आहेत'असे कृतज्ञता पूर्ण भावोद्गार इंजिनीयर रत्नदीप दहिवले यांनी व्यक्त केले.
एरंडी नवेगाव बांध येथील दलित मित्र सुखदेवराव दहिवले यांच्या 75व्या अमृत महोत्सव व जीवन चरित्र प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रज्ञा शिक्षण संस्था अध्यक्ष सौ मालिनी ताई दहिवले भदंत संघ धातु ,आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे मंजुषा चंद्रिकापुरे ,अनिल दहिवले ,उज्वला नागभिडे प्रज्ञा भगत ,इंजि. विजय मेश्राम साहित्यिक ,आंबेडकरी विचारवंत चंद्रशेखर बांबोडे,सिनेअभिनेते ऋतुराज वानखेडे अभिनेत्री डॉक्टर सरोज पाटील ,अभिनेता चेतन गाढवे ,झाडीबोली चे अभ्यासक डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर ,हिरामण लंजे,हंसराज रामटेके ,नूतन दहिव ले,प्राचार्य त्रिवेणी दहिवले, गजानन डोंगरवार ,शिवनारायण पालीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छायाचित्र समोर दीपप्रज्वलन करून त्रिशरण व पंचशी लेसह अभिवादन करण्यात आले .मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. मंचावर उपस्थित सर्व अतिथींचे शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 'सुखदेव जी दहिवले यांनी आपल्या कष्टाचे चीज करून संबंध विदर्भात आपल्या कार्याची छाप पाडली त्यांनी शिक्षण गंगेच्या माध्यमातून इतरांचे जीवन समृद्ध केल्याचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी सांगितले.
शिक्षणाची गंगोत्री घराघरात पोहोचविणारी दहिवले साहेब हे खरेखुरे शिक्षणमहर्षी आहेत' असे उद्गार आंबेडकरी विचारवंत चंद्रशेखर बांबोळे यांनी काढले. तसेच 'सर्वसामान्य माणसांसाठी ज्ञानाची दारे उघडी करणारे ज्ञान सेतू म्हणजे दहिवले साहेब' असे झाडीबोली चे प्रणेते डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांनी मत व्यक्त केले तर 'इतरांच्या कल्याणासाठी धावून जाणारे कणखर व्यक्तिमत्त्व म्हणजे दलित मित्र समाज भूषण सुखदेवराव दहिवले आहेत'असे प्रतिपादन जयंती चित्रपटाचे सुप्रसिद्ध अभिनेते ऋतुराज वानखेडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते सुखदेवराव दहिवले यांचे जीवन चरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले .यावेळी हजारो लोकांची उपस्थिती प्रामुख्याने होती.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्या. विलास रहांगडाले यांनी तर आभार प्राचार्य त्रिवेणी रत्नदीप दहिवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्ञा शिक्षण संस्था एरंडी नवेगाव बांध द्वारा संचालित सर्व शाखांचे व वसतिगृहातील कर्मचारी वृद्धांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत