विराआस जिवती तर्फे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना जिवती तहसीलदार मार्फत निवेदन
विराआस जिवती तर्फे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना जिवती तहसीलदार मार्फत निवेदन
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,शेख हक्कानी,जिवती : विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, नक्षलवादला आळा घालण्यासाठी, प्रदूषण व कुपोषण संपविण्यासाठी, बेरोजगारांच्या रोजगारासाठी व विदर्भातील शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी एकच उपाय ,,''स्वतंत्र विदर्भ राज्य''1997 साली भाजपने भुवनेश्वरला राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये विदर्भाचा ठराव केला,लगेच अटलजींनी छत्तीसगड,उत्तरांचल व झारखंड ही तीन नवी राज्य निर्माण केली.परंतु तेव्हा केंद्रात शिवसेना सत्तेत असल्यामुळे त्यांच्या धाकाने अटलजींनी विदर्भ दिला नाही.
2014 च्या महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपाने विदर्भातील जनतेला विदर्भाच्या नावाने मते मागितली व विदर्भातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपचे 44 आमदार निवडून दिले,पुन्हा राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आले,व पुन्हा शिवसेनेच्या विरोधामुळे केंद्राने विदर्भ दिला नाही, दोन्ही वेळेत भाजपने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला.म्हणून 2019 मध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीने केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे व जनजागृती मुळे विदर्भातून भाजपचे 15 आमदार कमी झाले,
व विदर्भातील जनतेने महाराष्ट्रातून भाजपची सत्ता संपविली,आतातर भाजपा व शिवसेनेची सोडचिठ्ठी झाल्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना चटप साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भातील 11 जिल्हे व 120 तालुक्यातुन निवेदन देण्यात आले चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया विभाग प्रमुख सुदामभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात जिवती तहसीलदार मार्फत पंतप्रधान व गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत