Breaking News

लोणंदचा कचरा असाच पेटत राहणार ?

 

लोणंदचा कचरा असाच पेटत राहणार ?

नगरपंचायतीकडून घनकचरा प्रकल्प कधी मार्गी लागणार?

महा घडामोडी न्युज ब्यूरो चीफ,दिलीप वाघमारे,सातारा : लोणंद ता.खंडाळा येथील निंबोडी रोडवरअसलेल्या कचरा डेपोस आग लागल्याने लोणंदमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.जिथे जागा उपलब्ध होईल अशा ठिकाणी कचरा डेपो तयार केला जात आहे.त्यामुळे कचऱ्या डेपोचे ठिय्ये बदलत आहेत.यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.

गेली अनेक वर्षांपासून हा प्रकल्प व्हावा म्हणून लोकांकडून मागणी होत आहे.परंतु या विषयाकडे जागेअभावी तसेच अनेक अडचणी येत आहेत.त्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कचऱ्याची समस्या आजही जैसे थे आहे.प्रकल्प उभारण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पाला खो बसला आहे.

लोणंद शहरातील कचरा गोळा केल्यानंतर तो साठवून ठेवण्यासाठी कचऱ्याचे डेपो ही सारखे बदलावे लागलेले आहेत.कचरा डेपोचा प्रश्न हा गंभीर झालेला असून यासाठी यापूर्वी आंदोलन करण्यात आलेले होते.कचरा पेटला की लोणंदकर नागरिक सुद्धा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित करत असतात.प्रत्येक वेळी कचरा डेपो पेटत असताना तो पेटला आहे की पेटविला गेला आहे असा प्रश्न ही उपस्थित होत असतो.

घनकचरा प्रकल्पास जागा मिळत नसल्याने कचरा डेपोचे ठिय्ये करावे लागत आहेत.एखाद्या घोंगडी प्रमाणाने हा प्रकल्प भिजत पडलेला आहे.घनकचरा प्रकल्पाबाबत अभ्यासदौरा ही करण्यात आलेला आहे.अभ्यासदौऱ्याचे लवकरच चीज व्हावे आणि लवकरच हा प्रकल्प उभारला जावा.अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.आज आगीचा पेट घेतलेल्या कचऱ्याबाबत पुन्हा एकदा लोणंदचा रखडलेला कचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आलेली असून यावर तोडगा काढण्यासाठी येथील नगरपंचायतीतील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवाच.

लोणंद नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग लागते की लावली जाते.हा एक प्रश्न उपस्थित होत आहे.गेल्या वेळी गोटेमाळ पाण्याच्या टाकी खाली अशाच प्रकारे कचरा डेपोला आग लागली होती.त्याच प्रमाणे आजही निंबोडी रोड येथील कचरा डेपोला आग लागल्याने यापूर्वीच्या कचरा डेपो ला लागलेल्या आगीची आठवण झाली.हे कुठवर असेच चालणार,पेटलेला कचरा असाच पाहायचा आणि असाच विझवत राहायचे का ? हे आता थांबायला हवे. घनकचरा प्रकल्प उभारणे हाच यावर एक पर्याय आहे, सुनील यादव,युवा नेते शिवसेना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत