Breaking News

विजेच्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एका बैलाचा मृत्यू

 विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मुक्या जनावराने गमवला जीव 

 विरुर स्टेशन शेत शिवारातील घटना 

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरुर स्टेशन : पोलीस स्टेशन विरुर स्टेशन शेत शिवारात शेतकऱ्याच्या बैलाच्या विजेच्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्शांना मृत्यू झाल्याची घटना विरुर स्टेशन येथे घडली आहे,यात ज्ञानेश्वर मोरे शेतकऱ्यांनी तार तुटून असल्याची माहिती तीन महिन्यापासून सबंधित अधिकारी रोहित मकासरे, कनिष्ठ अभियंता यांना देण्यात येत होती, परंतु विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची उपायोजना केली नसल्याचा आरोप शेतकरी ज्ञानेश्वर मोरे यांनी केला आहे. 

प्रभाकर राऊत या शेतकऱ्याचे बैल शेतातून मशागत करून घराकडे जाण्याकरिता निघाले होते. त्यात त्यांचा रोजगार श्री रमेश गणपत आत्राम व त्यांच्या पत्नी बैलबंडी वरती बसून घराच्या दिशेने निघाले असता थोड्या अंतरावर डोंगरगाव कॅनल रोड वरती विजेचे जिवंत विद्युत तारावरती बैलाचा पाय पडला असता, 


एक बैल खालती पडला पण रमेश ह्या वक्तीला ला काहीच कळाले नाही. माझा बैल का पडला म्हणून ओरडा ओरड करू लागला, त्यांचा दोर सोडायला गेला असता त्यालाही विद्युत स्पर्श झाला व तो दूर जाऊन पडला व बैलाचा जागीच मृत्यू झाला बैलाची किंमत अंदाजे 90 हजार जवळपास असून शेतकरी प्रभाकर राऊत यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे, 

पंधरा दिवस अगोदर त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यातच कसेबसे सावरत नाही. तो काबाड कष्ट करणारा माझ्या सर्जा राजां विद्युत विभागाच्या गलथान कारभार मुळे जागीच ठार झाला, ऐन हंगामात शेतकऱ्याच्या बैल मरण पावल्याने प्रभाकर राऊत यांचा वर मोठे संकट कोसळले आहे. गावातील सरपंच भाग्यश्री आत्राम, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष राजू इग्रपवार, अजय रेड्डी, प्रविण चिडे, यांना कळताच तात्काळ घटनास्थळ दाखल झाले व कनिष्ठ अभियंता रोहित मक्कासरे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले, 

शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरती चर्चा करण्यात आली पण विद्युत विभागाकडे कोणतीही जीवितहानी झाली तर तात्काळ मदत देण्याकरिता कोणतीही निधी किंवा कोणताही जीआर नसल्याने आम्ही त्यांना तात्काळ मदत देऊ शकत नाही असे येथील उप कार्यकारी अभियंता राजुरा यांनी उडवा उडविची उत्तर दिले. सरपंच भाग्यश्री आत्राम यांनी कनिष्ठ अभियंता यांना आपण मुख्यालय का राहत नाही असा सवाल केला असता संबंधित अधिकारी यांनी इंटरनेट सुविधा नसल्याने मी मुख्यालय राहू शकत नाही असे अजबच उतर दिले.

शेतकऱ्यांमध्ये आता असा प्रश्न निर्माण होताना दिसून येते आहे की आम्हाला कुणी वाली आहे की नाही आम्हाला तात्काळ मदत का नाही. आम्ही आपल्या विद्युत विभागाला पूर्वीच कल्पना दिली होती पूर्वीच लक्ष दिले असते तर आज ही घटना माझ्यावर घडली नसती,असे शेतकरी प्रभाकर राऊत यांनी मक्कासरे कनिष्ठ अभियंता यांना आपले अश्रू पुसत असा प्रश्न केला उपस्थित शेतकऱ्याला मोबदला मिळावा यासाठी सरपंच मॅडम भाग्यश्री आत्राम, माजी.तंटामुक्त राजू इग्रपवार.अजय रेड्डी.ज्ञानेश्वर मोरे.प्रविण चिडे उमेश मोरे प्रभाकर राऊत यांनी पोलिस स्टेशन विरुर येथे तक्रार दिली व पुढील तपास ठाणेदार चव्हाण साहेब यांच्या नेतृतत्वाखाली करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत