शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेत पिकाचे पंचनामे करा- हकानी शेख
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेत पिकाचे पंचनामे करा- हकानी शेख
महा घडामोडी न्यूज नेटवर्क हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी जिवती:-महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी जाहीर केली परंतु त्या अतिवृष्टीच्या यादी मधून चंद्रपूर जिल्ह्याला वगळण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. चंद्रपूर जिल्ह्यासह जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिवती तालुक्यातील मुख्य पीक कापूस असून. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाला लागलेले फुल चाफे गळून पडली. बोंड झाडाला सडली असून सुद्धा जिवती तहसीलचे तहसीलदार मॅडम यांचे म्हणणे आहे की जिवती तालुक्यातील एकही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले नाही. तालुक्यातील जबाबदार अधिकारी अशा भाषेत शेतकऱ्यांना बोलत आहे. तर शेतकऱ्यांचे वाली कोण या बाबीकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे जिवती तालुका अतिवृष्टी यादीमध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मोबदला द्यावा.अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे 80 ते 90 टक्के नुकसान होऊन कापूस पिकाचे पंचनामे करीत नसल्यामुळे कापूस उपडून तहसील कार्यालयात फेकण्यात येणार असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला.
आपले शासकीय कर्मचारी पीक पंचनामे करण्यासाठी येत आहेत व फक्त सोयाबीन पिकाचे पंचनामे करीत आहेत कापूस पिकाचे पंचनामे करीत नाही तरी आपण आपल्या कर्मचाऱ्यांना इतरही पिकाचे पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावेत. अन्यथा कापूस उपटून शेतकऱ्यांना घेऊन तहसीलदार यांच्या केबिनमध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा हकानी शेख तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत