Breaking News

निम्न दुधानातून दोन्ही कालव्यात 50 क्यूसेसने पाणी सोडले

 निम्न दुधानातून दोन्ही कालव्यात 50 क्यूसेसने पाणी सोडले

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : अचानक पावसाने दांडी मारल्याने खरीपातील पिकांना पाणी देण्यासाठी निम्न दुधाना प्रकल्पातुन रविवार 4 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12वाजता दोन्ही कालव्यात 50 क्यूसेसने पाणी सोडण्यात आले.त्यामुळे कालवा लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

खरीपातील कापूस, सोयाबीन,तूर आदी पिके बहरात असतानाच अचानक 20 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकू लागली आहेत.सोयाबीणच्या शेंगा भरण्याची वेळ असतानाच पावसाने दांडी दिल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.त्यामुळे निम्न दूधना प्रकल्पातुन दोन्ही कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी आ. मेघना बोर्डीकर, आ. डॉ राहुल पाटील तसेच सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आली होती.त्यानंतर रविवारी दूधनाप्रकल्पातुन उजव्या आणि डाव्या कालव्यातून 50 क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

टेलपर्यंत पोहोचेपर्यंत पाणी चालू राहणार आहे.दरम्यान सेलू, जिंतूर,मानवत आणि परभणी तालुक्यातील कालवा लाभक्षेत्रातील खरीप हगामातील पिकांना यां पाण्याचा फायदा होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत