Breaking News

देवदर्शनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा अपघाती मृत्यू

देवदर्शनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा अपघाती मृत्यू



महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,मीनाताई राहिंज,नगर : कर्नाटकातील अफझलपूर तालुक्यातील बळोरगी येथे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्त कुटुंब मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर सध्या अफझलपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गाणगापूर येथील दत्त महाराजांचं दर्शन घेऊन भाविक परत येत होते. मात्र गाणगापूर-सोलापूर मार्गावर कर्नाटक हद्दीतील बळोरगी गावाच्या परिसरात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली. या अपघातात बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अर्णव वीर, हिराबाई वीर, छाया बाबासाहेब वीर यांनी आपला जीव गमावला. तसंच सायली बाबासाहेब वीर आणि चैत्राली दिनकर सूर्यवंशी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघाताबाबत कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. भीषण अपघाताने गाडीचा चक्काचूर झाला होता. त्यामुळे गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्यानंतर दोन जखमींना तातडीने अफझलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, या अपघाताबाबत अफजलपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत